Friday, August 29, 2025

गणपतीउत्सव

श्रावणातली व्रत-वैकल्याची धामधूम संपत असतानाच वेध लागतात गौरी-गणपतीचे! 



भारत देशामध्ये संस्कृती आणि परंपरा जपल्या जातात तसेच वर्षभर वेगवेगळे सण साजरे केले जातात. भारतामधले सगळे सण आनंदाने आणि उत्साहाने साजरे केले जातात पण त्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे गणपती उत्सव. गौरी-गणपती या सणांबद्दल लोकांच्या मनामध्ये एक वेगळेच प्रेम आहे.  सर्व प्रकारच्या शुभकार्यात सर्वप्रथम गणपतीचे पूजन केले जाते. शिव-पार्वतीचा पूत्र गणपतीला विद्येचे दैवत मानले जाते.

भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (साधारणत ऑगस्ट, सप्टेंबर या काळात ) गणेश चतुर्थी येते. घराघरात गणपतीची मूर्ती आणली जाते व 11 दिवस मोठ्या भक्तीभावाने तिची पूजा केली जाते. 

महाराष्ट्र, तेलंगणा, गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, गोवा, ओडिशा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बालीमध्ये या उत्सवात घरोघरी आणि सार्वजनिक पंडालमध्ये भगवान गणेशाच्या मातीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून कुटुंबे, मंडळे, गटांकडून पूजा केली जाते.  परंतु उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये मंदिरांमध्ये भगवान गणेशाची तात्पुरती मूर्ती बसवून हा उत्सव साजरा केला जातो. 

सार्वजनिकपणे गणेशोत्सव गणपती मंडळांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने सजावट करून साजरा केला जातो. सार्वजनिक मंडळे या काळात आकर्षक देखावे उभारतात. यात ऐतिहासिक, पौराणिक, सामाजिक देखावे असतात. सगळेजण सजावट, गणपती आणणे, विसर्जनात हिरिरीने भाग घेतात. सकाळ, संध्याकाळ आरती, प्रसाद - खिरापत, लाडू आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, रात्रीचे कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर यांचे आयोजन करुन गावातील मुलांना, कलाकारांना त्यांच्या कला सादर करायला वाव मिळतो. त्याशिवाय वेगवेगळ्या स्पर्धांचेही आयोजन केले जाते. लोकांना एकत्र येण्याची संधी मिळते. काही काही गणेश मंडळे सामाजिक उपक्रमही राबवतात ही स्तुत्य बाब आहे. गेल्या काही वर्षांत पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्याने, लोकांनी गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्यास सुरुवात केली आहे. 

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी खरोखरच एक अनोखा पर्याय म्हणजे भक्तीसंगीत, वाद्य संगीत कार्यक्रम. कलाकारांना गणपतीचे अभंग, भजन आणि भक्तिगीते गाण्यासाठी आमंत्रित करतात. 

संगीत आपल्या मनाला आनंद देते. इंस्ट्रुमेंटल म्युझिकमध्ये खूप वैविध्य आहे. बासरीवादन, व्हायोलिन, सरोद, सतार, जलतरंग, फ्यूजन, सोलो कॉन्सर्ट , वाद्यांची जुगलबंदी इत्यादी यांसारखे कार्यक्रम करणारे कलाकार आहेत, ज्यांना सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाऊ शकते. गणेश मंडळे आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करतात. तसेच शास्त्रीय गायन कार्यक्रम, मधुर संगीत वाद्यवृंद,ऑर्केस्ट्रा . बॉलीवूड क्लासिक्स, समकालीन हिट्स, लोकगीते इत्यादी सादर केले जातात. 'हसणे ​​हे सर्वोत्तम औषध आहे', ही सुप्रसिद्ध म्हण आहे. कॉमेडियन सहसा विनोदी कथा, विनोद, वन-लाइनर्स किंवा मिमिक्री करतो. कॉमेडी शो तुमच्या आवडीच्या भाषेत असू शकतो. 

गणपती बसल्यनंतर दोन दिवसांनी गौरींचे आगमन होते. त्या तीन दिवस राहतात.  फक्त तीन‌ दिवसांचंच त्यांचं माहेरपण. पण येताना आपल्यासोबत त्यांनी आणलेला उल्हास-चैतन्य मात्र वर्षभर पुरत. लक्ष्मी किंवा गौरीच्या मांडणीत विविधता असली तरी जमीन समृद्ध करण्यासाठी धान्य लक्ष्मीची पूजा करणे हा मूळ हेतू असतो. भारतात भाद्रपदातली ज्येष्ठा गौर महाराष्ट्रातही विविध प्रकारे अवतरते. सालंकृत मूर्तिरूपात अनेक ठिकाणी ती जोडीने येते. ज्येष्ठा आणि कनिष्ठा!  या मूर्तिरूपांना बहुधा महालक्ष्मी, लक्ष्म्या म्हणतात. कोकणात अनेक ठिकाणी एकच मूर्ती असते. कोकण-गोवा प्रदेशात मुखवट्याची एकच गौरीची मूर्ती असते. पण त्याच जोडीला पाणवठ्याकाठी असलेले गोटे, आपोआप उगवलेली रंगीबेरंगी फुलांची तेरड्याची रोपे आणून तीच गौर म्हणून पुजतात. म्हणून हल्ली गौरी- गणपती समोर मंगळागौरीचे कार्यक्रम केले जातात.




अकरा दिवसांनी म्हणजे अनंत चतुर्थीला ढोल-ताशा, नगारे वाजवीत गणपतीला विसर्जनासाठी तयार केले जाते. गणेश विसर्जनासाठी एक भव्य रथ सजवला जातो. यानंतर गणपतीची आरती करून संपूर्ण शहरात शोभायात्रा काढीत "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" या तऱ्हेच्या गर्जना ,अशा घोषणा देत गणपती बाप्पाचे विसर्जन करताना अंत:करण दु:खी होते. मिरवणुकीच्या शेवटी शहरातील तलाव, नदी अथवा समुद्रात भगवान गणेशाने विसर्जित करतात.

Links of Gnapati songs ( For booking program contact us on 9867841536, 9987597439) 

https://www.youtube.com/shorts/tK336eWhlpk
https://www.youtube.com/watch?v=sfGZ7KQUQbE
https://www.youtube.com/watch?v=fE_9ArIhUyM
https://www.youtube.com/watch?v=Iku-EyBHOcM
https://www.youtube.com/watch?v=T95I-hyMzYk

Friday, August 8, 2025

कजरी (Kajari) (semi classical form)

भारताच्या प्रत्येक राज्यातील लोकगीतांमध्ये पावसाळा ऋतूचे खास स्थान आहे. त्यातही उत्तर प्रदेशातील मिर्झापूर, वाराणसी, बलिया, चंदौली व जौनपूर या भागातील कजरी ही गायनशैली अत्यंत लोकप्रिय आहे. ही गायकी श्रावण महिन्यात गावोगावी झुल्यांवर खेळणाऱ्या सख्या व महिलांच्या मनोभावना व्यक्त करणारी आहे.

कजरीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात सृष्टीचा सौंदर्य, विरहाची वेदना, स्त्रीच्या भावना आणि कृष्ण-राधेच्या लीला या सर्वांचे सुंदर मिश्रण आढळते. मिर्झापूरची देवीगीतांपासून सुरू झालेली ही परंपरा आज Semi classical संगीताचा भाग बनली आहे. बनारस घराण्याचे कजरी गायनात मोठे योगदान आहे.

कजरीमध्ये श्रृंगार आणि विरह रस यांचे सामर्थ्य आहे. नणंद-भावजयीचे प्रेमळ संवाद, प्रेमात विहार करणाऱ्या स्त्रियांचे भावविश्व, वियोगातील आर्त हाक – हे सगळे कजरीच्या गीतांमध्ये दिसते. उदाहरणार्थ: 

“कैसे खेलै जइबू सावन में कजरिया, बदरिया घेरे आये ननदी…”




कजरीचे प्रकार: मिर्झापुरी कजरी, बनारसी कजरी आणि अवध क्षेत्रातील सावनी इत्यादी. तसेच चैत, झुला आणि होरी याही गायनशैली कजरीसह गायला जातात.


शास्त्रीय गायनात कजरीचा वापर अर्धशास्त्रीय प्रकार (Semi classical)  म्हणून केला जातो. आज अनेक प्रसिद्ध कलाकार हे कजरी, झुला, होरी, चैत, दादरा, ठुमरी या गायनशैली सादर करतात.


इतिहास: काही जनश्रुतीनुसार मिर्झापूरच्या एका राजकन्येचं नाव ‘कजरी’ होतं. ती आपल्या नवऱ्याच्या विरहात भावविवश होऊन हे गीत गात असे, त्यावरूनच या गायकीचे नाव पडले. 

कजरी हे केवळ लोकसंगीत नसून एक सामाजिक संस्कृतीचे प्रतीक आहे. स्त्रियांची भावना, एकी, सामूहिक आनंद आणि निसर्गप्रेम यांचा संगम या गीतांमध्ये आढळतो.




काही प्रस‍िद्ध कजरी/कजली

1. देखो सावन में हिंडोला झूलैंदेखो सावन में हिंडोला झूलैं मन्दिर में गोपाल।

राधा जी तहाँ पास बिराजैं ठाड़ी बृज की बाल।।

2. हरि संग डारि-डारि गलबहियाँहरि संग डारि-डारि गल बहियाँ झूलत बरसाने की नारि।

प्रेमानन्द मगन मतवारी सुधि बुधि सकल बिसारि।।

3. हरि बिन जियरा मोरा तरसेहरि बिन जियरा मोरा तरसे, सावन बरसै घना घोर।

रूम झूम नभ बादर आए, चहुँ दिसी बोले मोर। रैन अंधेरी रिमझिम बरसै, डरपै जियरा मोर।।

4. छैला छाय रहे मधुबन मेंछैला छाय रहे मधुबन में सावन सुरत बिसारे मोर।

मोर शोर बरजोर मचावै, देखि घटा घनघोर।।

5. झूला झूलन हम लागी हो रामाझूला झूलन हम लागी हो रामा, मिल गए साजनवा।

6. तरसत जियरा हमार नैहर मेंतरसत जियरा हमार नैहर में । 
बाबा हठ कीनॊ, गवनवा न दीनो | बीत गइली बरखा बहार नैहर में ।

7. हरी रामा सावन बीता जाय सजन नहीं आये रे हारी सजन नहीं आये रे हारी सजन नहीं आये रे हारी
हरी रामा सासु हमारी अति समुझाबयं रामा मोर बहुआ राखा धीरज मन माही ललन घर अइहइं रे हारी ललन घर अइहइं रे हारी ललन घर अइहइं रे हारी हरी रामा सावन बीता जाय

8. आई सावन की बहार छाई घटा घनघोर बन में, बोलन लागे मोर। रिमझिम पनियां बरसै जोर मोरे प्यारे बलमू।।

9.  हरि बिन जियरा मोरा तरसे हरि बिन जियरा मोरा तरसे, सावन बरसै घना घोर। रूम झूम नभ बादर आए, चहुँ दिसी बोले मोर। रैन अंधेरी रिमझिम बरसै, डरपै जियरा मोर।।

10. तरसत जियरा हमार नैहर में तरसत जियरा हमार नैहर में । बाबा हठ कीनॊ, गवनवा न दीनो बीत गइली बरखा बहार नैहर में ।

11. देखो सावन में हिंडोला झूलैं देखो सावन में हिंडोला झूलैं मन्दिर में गोपाल। राधा जी तहाँ पास बिराजैं ठाड़ी बृज की बाल।।

12. छैला छाय रहे मधुबन में छैला छाय रहे मधुबन में सावन सुरत बिसारे मोर। मोर शोर बरजोर मचावै, देखि घटा घनघोर।।

13. हरि संग डारि-डारि गलबहियाँ हरि संग डारि-डारि गल बहियाँ झूलत बरसाने की नारि। प्रेमानन्द मगन मतवारी सुधि बुधि सकल बिसारि।।

14 .भोजपुरी कजरी लोक गीत  -
चला पेड़वा लगावा गोरी ना
आवा देशवा बचाई गोरी |
बहाना ना बनावा गोरी |
चला पेड़वा लगावा गोरी ना |

Tuesday, April 1, 2025

गीतरामायणाची निर्मिती - ७० वर्षांचा सुवर्णमहोत्सव

आज गीतरामायणाला ७० वर्षे पूर्ण होत आहेत, आणि तरीही यातील गीते तितकीच ताजी वाटतात. ही केवळ काव्यसंपदा नाही, तर मराठी जनमानसाच्या हृदयात कोरलेला सांस्कृतिक ठेवा आहे. आज, १ एप्रिल २०२५ रोजी, ग. दि. माडगूळकर (गदिमा) आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या अजरामर कलाकृती 'गीतरामायण'च्या प्रसारणाला ७० वर्षे पूर्ण झाली आहेत. रामायणातील प्रसंगांवर आधारित ५६ मराठी गीतांचा हा संग्रह १ एप्रिल १९५५ रोजी आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होण्यास सुरुवात झाली होती.




गीतरामायणाची निर्मिती - "रामायण गाण्यातून जिवंत झाले, आणि काळाच्या पुढे जाऊन अजरामर झाले!" 


१९५५ मध्ये पुण्याच्या आकाशवाणी केंद्राचे तत्कालीन प्रमुख वसंत बापट यांनी ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांना एक संकल्पना मांडली – "रामायणावर आधारित गीतमालिका सादर करायची आहे." ही कल्पना दोघांना फार भावली आणि त्यांनी फक्त ३५ दिवसांत ५६ गाणी तयार केली.


गदिमांनी लिहिलेल्या या गीतांना बाबूजींनी संगीतबद्ध केले असून, त्यांनीच रामाच्या भूमिकेतील गाणी गायली आहेत. सुगम संगीताच्या क्षेत्रात श्रीरामाच्या जीवनावर आधारित ५६ गाण्यांचा हा संग्रह मराठी रसिकांच्या हृदयावर कायमचा कोरला गेला आहे. ही गीते आकाशवाणीच्या प्रसारणानंतर अतिशय लोकप्रिय झाली. विविध नाट्यरूपे, संगीत मैफली आणि ऑर्केस्ट्रा सादरीकरणांमध्ये ही गीते आजही गायली जातात.


'गीतरामायण'मधील काही प्रसिद्ध गीते पुढीलप्रमाणे आहेत:


स्वये श्रीरामप्रभु ऐकती

सरयू तीरावरी अयोध्या

उगा कां काळिज माझें उले

लाडके कौसल्ये राणी

दशरथा घे हें पायसदान

राम जन्मला ग सखी

सांवळा ग रामचंद्र

ज्येष्ठ तुझा पुत्र मला

मार ही ताटिका रामचंद्रा

चला राघवा चला


या गीतांमध्ये रामायणातील विविध प्रसंगांचे सुंदर चित्रण केले गेले आहे, ज्यामुळे 'गीतरामायण' आजही मराठी संगीतप्रेमींच्या हृदयात विशेष स्थान राखून आहे.


'गीतरामायण' मधील सर्व ५६ गाण्यांची यादी:

बालकांड

स्वये श्रीरामप्रभु ऐकती

सरयू तीरावरी अयोध्या

उगा कां काळिज माझें उले

लाडके कौसल्ये राणी

दशरथा घे हें पायसदान

राम जन्मला ग सखी

सांवळा ग रामचंद्र


अयोध्याकांड

ज्येष्ठ तुझा पुत्र मला

मार ही ताटिका रामचंद्रा

चला राघवा चला

प्रिय सखा रे वियोग हा

बोल सखे ग बाई बोल

कृष्णा, कमळा आणि कोवळा चंद्रमा

जाईन वचन तुझे सोडून


अरण्यकांड

अनाथांचा नाथ ग बंधो

शोकांतिका सीतेची

तेजाने तुझ्या उजळला देस हा

गोड गोड सांगे रामराया

उभा ग गाभारा अंबाबाईचा

अयोध्येच्या राजा चला


किष्किंधाकांड

आज आहे किष्किंधा नगरीत

कपि सामर्थ्य दाखवीला हनुमान

शब्द देतों, सीता शोधतो

आकाश मार्गे जातो स्वारी

मी सोडुनियां रामासि आला


सुंदरकांड

लंका जळाली रे जळाली

हनुमंता पुढे चालत जा

सीता शोधूनि आलो

ही विजयी मुद्रा रामाची

सीता सांगे रामराया


युद्धकांड

सैन्य रामाचे पुढे गेले

पाहिला रामरूपी महाबळ

रावण हृदयात उठला क्रोध

धनुष्य सज्ज कर रघुनंदना

शक्ती शेजारी माजले दुखः

हे राम राघव कृपाळु भूपा

रामचंद्राने वानरसेनेला सांगितले

पाहुणी प्रभूची शक्ति

उध्दारिला रावणास प्रभू


उत्तरकांड

संपला युध्द आता

राम राज्याची सुरुवात झाली

अयोध्या नगरी आनंदली

सीतेसही नयनी अश्रू आले

रामराज्य याचा गौरव गा

राज्य अभिषेक रामाचा झाला


विशेष गीतं

तुलसी फुलला ग रामाचरणी

जय जय राम कृष्ण हरी

चला रामाच्या पंढरीला

सर्वत्र रामचंद्र जपावा

हे राम तू सुखकर्ता

शांत राम, सुमन राम

म्हणू नका राघवा

रामनाम गात चला

श्रीरामप्रभूची आरती

श्रीरामचंद्र कृपालु भज

जय जय रामराया


हे सर्व गीते आजही रसिकांच्या मनामध्ये विशेष स्थान राखून आहेत. 'गीतरामायण' हे केवळ संगीत न राहता, एक आध्यात्मिक प्रवास ठरले आहे.

Tuesday, January 28, 2025

सुमन कल्याणपूर यांना ८८व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतीय संगीतक्षेत्रातील सुवर्णअध्याय लिहिणाऱ्या महान गायिका सुमन कल्याणपूर यांचा ८८वा वाढदिवस! 

२८ जानेवारी १९३७ रोजी ढाका येथे जन्मलेल्या सुमनताईंच्या सुरेल आवाजाने हिंदी, मराठी, बंगाली आणि इतर भाषांमध्ये रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांची गायकी, साधेपणा आणि सुरेलतेची जादू आजही अविस्मरणीय आहे.



Article by Lata Ballal 

दिलने फिर याद किया !🎼🌟🎻🌙🌈

ऐकलं आणि सुमन कल्याणपूर  चा प्रसन्न  चेहरा डोळ्यासमोर  तरळला आणि अनेकानेक गीतांची गर्दी झाली . किती गोड कंठ !! कदाचित  मातीचा गुण असेल! "रोशगुल्ला" च्या प्रांतातील जन्म ना!!!😀🙏🏻पण खरंच कसं बरं वर्णन करावं? माजघरातील कांकणाची  किणकिण? की शालीन ,घरंदाज युवतीने थोरामोठ्यांचा आब राखित ,अधीर भावनांना धिराने सावरत गुणगुणलेलं सूर! काही म्हणा पण आपल्याच घरातला ,ओळखीचा वाटणारा मधाळ स्वर ,म्हणजेच सुमन कल्याणपूर!सोनटक्यापरी मंद शुभ्र !! हे " शुभ्र कांही जीवघेणे" असले तरी अदा मात्र कातील नाही !! तिची (अरे देवा म्हणतो ना, तद्वत)!

गणाधीपाss..,तुझ्या कांती सम ...भक्ती गीतं ऐकली की ,धूपगंध दरवळत  राहतो मनांत!!आणि समईच्या शुभ्र कळ्यात उजळतो !!🪔🌟

तर केतकीच्या बनांत  अलगद नेऊन सोडते , आणि मनमोर नाचू लागतो !  हेच तर वैशिष्ट्य !! मराठी ,बंगाली , गुजराती ,आणि हिंदी  किती एक गाणी तिने खुबीने गायली!! कुठलाही आविर्भाव न आणता, अगदी सहज साधं सुंदर! पण त्या त्या माहोलमध्ये कासेनांना डुंबवत!! ते ही अगदी कळू न देता.सगळीच गाणी अवीट गोडीची आणि नजाकतीनं भारलेली!

म्हणूनच आजकल "तेरे मेरे  प्यार के चर्चे" थिल्लर झालं नाही! बिनधास्त ,खुलेपणाने ऐकावी अशी एकाहून एक सुरस गीतं !!पण मला मात्र ,"बात एक रातकी "मधलं "ना हम तुम्हे  जाssने,...हे काळजात कोरून ठेवावंस वाटतं !!!  गाणं कधी संपलं कळतच नाही , मन मात्र त्या सुरातंच लपेटून राहतं ! गारुड आहे नुस्तं, सगळ्याचं गाण्यात तिची अमीट छान आहे. ती अनुभवणं जास्त सुखमयी! बकुळी च्या फुलांपरी !!!!🌼 

वाईट याचं वाटतं की, सुमन कल्याणपूर  ची तुलना लता सह केली गेली. एका झाडाची पानं सुध्दा  एकसारखी नसतात. तर माणसं ,आवाज ,कसे असतील ?  नभांगणात सूर्या सह  अनेक तारे तारका ,ग्रह असतात. आणि त्याचं प्रत्येकाचं वेगळेपण  आहे. अगदी तस्सं च!! या सुरेल संगीत मैफिलीत अनेकानेक दिग्गज आपापल्या स्थानी अढळ आहेत . उपमाच द्यायची झाली ,तर धृवतारा आहे सुमन कल्याणपूर!!! अढळ!!आणि हे तिने जोखलंय !! कांहीही कुरकुर न करता ती गात राहिली ,तिच्या आवाजात!निरवतेचा भंग न करता वाहणा-या नदी प्रमाणे !!! ती नादमयता या समंजस पणातूनच आली असावी! म्हणूनच तिची छबी  कशी प्रसन्न, आनंदी दिसते.

लखलखणारा हिरा नाही ,झळाळतं सुवर्ण  नाही, पण चांदण्यातही लकाकणारी मौक्तिक माळ आहे सुमन कल्याणपूर!!! वृंदावनातील पणतीची  मंगल , पिवळीकेशरी   आभा  विखूरलेली दिसते तिच्या मुखकमलावर!!!🌟🌟


         लतारविंद!!🎼🌷

---------------------------------------------------------------------------------------------------------------

सुमन कल्याणपूर यांच्या गाण्यांची यादी (हिंदी, मराठी आणि बंगाली)

हिंदी गाणी

तुमसे ओ हसीना कभी मोहब्बत ना मैंने करनी थी (फर्ज)

दिल एक मंदिर है (दिल एक मंदिर)

आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे (ब्रह्मचारी)

साथी मेरे साथी (वीराना)

ना तुम हमें जानो (बात एक रात की)

छोड़ो, छोड़ो मोरी बइयां (मियाँ बीवी राज़ी)

दिल ग़म से जल रहा (शमा)

यूँ ही दिल ने चाहा था (दिल ही तो है)

बुझा दिए हैं (शगुन)

मेरे संग गा (जवान)

मेरे महबूब ना जा (नूर महल)

तुम अगर आ सको तो (एक साल पहले)

ज़िंदगी डूब गई दर्द के तूफानों में (एक साल पहले)

ज़िंदगी इम्तिहान लेती है (नसीब)

जो हमपे गुज़रती है (मोहब्बत इसको कहते हैं)

शराबी शराबी ये सावन का मौसम (नूरजहाँ)

बहना ने भाई की कलाई में (रेशम की डोरी)

आंसू की एक बूंद हूँ मैं (एक पहेली)

मेरा प्यार भी तू है ये बहार भी तू है (साथी)

ना ना करते प्यार (जब जब फूल खिले)

ज़िंदगी ज़ुल्म सही (शगुन)


मराठी गाणी

रिमझिम झरती श्रावण धारा

शब्द शब्द जपून ठेवा

केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा

ओंकार प्रधान रूप गणेशाचे

जिथे सागरा धरणी मिळते

भक्तिच्या फुलांचा गोड तो सुवास

नविका रे वारा वाहे रे

केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर

या लाडक्या मुलांनो

समाधी घेऊन जाई ज्ञानदेव

मृदुल करांनी छेड़ित तारा

सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले

सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला

निंबोणीच्या झाडामागे


बंगाली गाणी

रंगेर बसोरे जोड़ी

ई चंद्र मल्लिकाते

दुराशार बालुचरे

मने करो आमी नेई

सुधु स्वप्न निये

कांदे केनो मन

तोमार आकाश थेके

बादोलर मदोल बाजे गुरुगुरु

आमार स्वप्नो देखार दुठी नयोन

आकाश अजन तौबू

पायर छिन्हो निये

दुलचेरे मन

ब्याथा होये केनो फिरे एले बंधुआ

भाबिस ने रे कांद्छी बोसे

एकाने ओकाने जेखाने सेखाने

दुरे ठेको ना आरो आरो काचे एशो


सुमनजींच्या सुमधुर आवाजात गाऊन अमर झालेली ही गाणी आजही रसिकांच्या मनात स्थान मिळवून आहेत.


Meetkalakar Team